हिंगोली । हिंगोली – नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर पार्डी मोड जवळ उभ्या खासगी बसवर ट्रक धडकून झालेल्या अपघात सात ठार तर चौदा गंभीर झाल्याची घटना 2 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. लक्झरी बस क्रमांक एम. एच. 38 एफ. 5786 ही नांदेडून हिंगोलीकडे येत होती. तर ट्रक क्रमांक (एन.एल. 01 क्यू 3757) हा भरधाव वेगाने नांदेडमार्गे जात होता. लक्झरीबस प्रवासी उतरविण्यासाठी थांबली होती. दरम्यान समोर वळणावरुन येणाजया भरधाव ट्रकने लक्झरीस जोराची धडक दिली. 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातातील जखमींची नावे
मुरहरी सुभान गोलर (60 रा. अर्धापूर), मिलींद मुरहरी गोलर (31 अर्धापूर), रंगराव रामजी पांढरे (60 मोरवड), म. असलम इब्राहीम (32 हरीयाना), मंगेश सुधाकर साखरे (22 सावरगाव), गंगाधर गोपाळराव देशमुख (35 घोडा) हे सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीना हिंगोली व नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर सचीन विठ्ठल देशमुख (25 बाभळी ता. कळमनुरी) संदीप शंकरराव सूर्यवंशी (22 बाभळी) निर्गुण राजेंद्र सूर्यवंशी (20 बाभळी), सोपान बालाजी सूर्यवंशी (19 बाभळी) गोपीनाथ मारोती राठोड (28 आ. बाळापूर) सपना गंगाधर देशमुख (25 रा. घोडा), अनुराग गंगाधर देशमुख (3 वर्ष घोडा), करीम खान नसीब खान (25 रा. सावरगाव) हे आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या जखमीवर कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. लोणीकर, दुर्गे, फरीदा गोहर, मेने, पंचलिंगे, खान आदींनी उपचार केले. घटनेची माहिती मिळताच पोनि. कुंदनकुमार वाघमारे, सपोनि सुधाकर आडे, फौजदार पठाण, प्रेमलता गोमाशे, खंदारे, सिद्दीकी, कपाटे, घोगरे, वसीम आदीनी धाव घेतली व जखमीना रुग्णालयात दाखल केले.
अपघातात सहा जणांचा झाला मृत्यू
एकबाल साहेब खॉ पठाण (25 सावरगाव), सुत्यभामाबाई गंगाधर डुकरे (25 रा. माळसरा), अरुणा रंगराव पांढरे (20 रा. मोरवड ), भीमराव श्रावण कांबळे (22), सीमा भीमराव कांबळे (26) अराध्या भीमराव कांबळे (2 वर्ष ) तीन्ही रा. भाटेगाव
अपघातानंतर मदतीस धावले नागरीक
कळमनुरी तालुक्यातील बाभळी येथील सचीन देशमुख, संदीप सूर्यवंशी, निर्गुण सूर्यवंशी, सोपान सूर्यवंशी हे चौघे औरंगाबाद येथून वाहकाची परीक्षा देऊन बाभळी येथे जाण्यासाठी खासगी बसने परतत असताना चौघेही जखमी झाले आहेत. काही क्षणातच दोन्हीही वाहने समोरा- समोर भिडली व अपघात झाला व एकच आराडा ओरड झाला. वाहनातून बाहेर येत नसल्याने प्रवासी आक्रोश करीत होते. त्यामुळे रस्त्यावरुन जाणारे वाहन धारक वाहने उभी करुन जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत करीत होते. हा अपघात एवढा भयंकर होता कही मयत चिमुकलीच्या मानेचा लचकाच तुटून गेला होता. तर इतरही प्रवाशांना लागलेल्या मारामुळे बसमधून रक्तांचे लोट निघत होते. बसमधील खुर्च्यांचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला होता.