बावनकुळे म्हणतात, मी तिकिट मागितले नव्हते

0

नागपूर : विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवरून भाजपामधील अंतर्गत मतभेद

चव्हाट्यावर येत असताना चंद्रशेख बावनकुळे यांनी मात्र, आपण पक्षाकडे तिकिट मागितले नव्हते, असा खुलासा केला आहे. तसेच एकनाथराव खडसे यांच्या
भूमिकेविषयी मी बोलणे योग्य नाही, असेही ते म्हणाले आहेत.

भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका केली. त्यानंतर प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांनी जोरदार उत्तर दिले.
पक्षाने एकाच घरात किती जणांना उमेदवारी द्यायची, असा सवालही उपस्थित केला. त्याचवेळी चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही, असे सांगितले. त्यांनीही दु:ख व्यक्त केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत मी विधानपरिषदेचे तिकीट मागितली नव्हते, असे म्हटले
आहे.

मला वाटते पक्षाची भूमिका जो कार्यकर्ता जिथे उपयुक्त आहे त्यानुसार ठरली असावी. विधानसभा निवडणुकीत मला पूर्व विदर्भातील ३२ जागांची जबाबदारी दिली होती. मला असे वाटते की त्यांच्या सध्याच्या भूमिकेवरुन असे चित्र दिसत आहे की आता जुन्या लोकांना तिकीट द्यायचे नाही. नवीन कार्यकर्त्याला द्यायचे. मी नाव पाठवले नाही आणि तिकीट मागितले नव्हते. पक्षाने माझ्या नावाचा विचार केला त्याबाबत धन्यवाद, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले मौन सोडले. पक्ष डावलत आहे, असे आजच्या दोन घटनांवरून म्हणता येत नाही. पुढच्या काळात योग्य जबाबदारी मिळेल, अशी आशा चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. खडसे यांच्या भूमिकेबाबत मी बोलणे योग्य नाही, असे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले