बीजेपीचे नाव बदलून बँजो पार्टी ठेवा!

0

विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला

मुंबई:- जाहिरातबाजीवर खर्च करणारे हे सरकार आहे का नाटक कंपनी? बीजेपीचे नाव बदलून बँजो पार्टी ठेवायला हवा असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांच्या वतीने विधानसभेत बोलताना विखे पाटील म्हणाले की राज्यपालाचे अभिभाषण निराशजनक होते. राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांचा सहभाग असलेलं एक गाण तयार केलं आहे. त्या गाण्यात आमचे मित्र सुधीरभाऊ पण खडकावर उभे असल्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. सुधीरभाऊ खडकावर उभे राहिले हे बघून आम्हाला काळजी वाटली म्हणून आम्ही त्यांना फोन लावला, पण त्यांचा फोन लागला नाही. जर ते त्या खडकावरून पडले तर अर्थसंकल्प कोण मांडणार? असा आम्हाला प्रश्न पडला असल्याचा चिमटा विखे पाटील यांनी काढला.

रिव्हर अँन्थम या व्हिडिओचा उल्लेख करत विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर टीका केली. विखे पाटील म्हणाले, ” ती डाक्यूमेंटरी पाहिल्यावर हे सरकार आहे का नाटक कंपनी असा प्रश्न आम्हाला पडला आहे ? बीजेपीचे नाव बदलून बँजो पार्टी ठेवायला हवे. त्या व्हिडिओमध्ये सेना कुठेच दिसली नाही. इतकी सेनेची उपेक्षा कशी काय करू शकते सरकार ? त्या व्हिडिओमधून मुंबई महापालिकेचे आयुक्त दिसतात तर तिकडे शिवसेनेचे महापौर कुणी घर देता का घर असे सांगत फिरत असल्याचा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. यावर महिलेचा अपमान होत आहे. पर्यावरणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यासंदर्भात त्यांच्या सौभाग्यवतीही सहभागी होता. त्यामुळे त्या गाण्याचा उल्लेख करून महिलेचा अपमान होतोय म्हणून भाजपच्या आमदार मनिषा चौधरी हरकत घेतली. सत्ताधाऱ्यांकडून विखे पाटलांच्या भाषणावर आक्षेप घेतला. सत्ताधारी आमदार विखे पाटील यांच्या भाषणातील तो उल्लेख कामकाजातून वगळा म्हणून आक्रमक झाले होते. त्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना तपासून काढून टाकण्याचे आदेश दिले. त्यावर विखे पाटील, ” मी त्यांच्या पत्नीबद्दल मी बोललो नाही. त्याचं नावही घेतललं नाही. त्यांच्यासंदर्भात कोणीही बोललं नाही. मी पंचवीस वर्ष या सदनाचा सदस्य आहे. त्यामुळे मी कुणाचा अवमान करणार नसल्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिल्याने वादावर पडदा पडला.

धर्मा पाटलांचा मृत्यू ही सगळ्या राज्याच्या मनाला चटका लावून जाणारी घटना होती. त्यांना साधी श्रध्दांजलीही या अभिभाषणात वाहिली नाही. ते जावू द्या निदान धर्मा पाटलांच्या कुटूंबियांना न्याय देण्यासाठी काही तरतूद केलीय का याचा उल्लेख या अभिभाषणात नाही. त्यामुळे राज्य सरकार गंभीर नसल्याचे सिध्द होते असे ते म्हणाले.