भांडणेही विनोदी वाटणारे युद्धाची भाषा करतात

0

मुंबई ।सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याबद्दल केलेल्या विधानावरून देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून भागवत यांना फटकारले होते. त्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी संघातील स्वयंसेवकांच्या होणार्‍या भांडणावर भाष्य करत भागवत यांची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आजपासून उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल यात्रेच आयोजन करण्यात आल आहे. यावेळी श्रीगोंदा येथील जाहीरसभेत ते बोलत होते.

कर्जमाफीवर टीका
आम्ही शेतकर्‍यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी केली होती. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत कर्जमाफी दिल्याचा गवगवा केला. मात्र, प्रत्यक्षात केवळ दीड लाखांची कर्जमाफी केली, ती देतानाही ऑनलाइनचा खुट्टा मारल्याची घणाघाती टीका यावेळी धनंजय मुंडे यांनी केली. पुढे बोलताना ‘ऑनलाइनमुळे ज्याला कर्जमाफी पाहिजे त्यांना सपत्नीक लाईनमध्ये उभ केले. सपत्नीक बोलवून मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरचा सत्यनारायण प्रसाद वाटायचा होता का असा प्रश्‍न मुंडे यांनी उपस्थित केला तसेच राज्यातील मंत्रिमंडळात एकही शेतकर्‍यांच पोर नसल्यानेच अशा गोष्टी घडत असल्याच ते म्हणाले.

संघाच्या कार्यपद्धतीची चेष्टा
मीदेखील कधीकाळी संघाच्या शाखेत गेलो असल्याचे सांगत धनंजय मुंडे यांनी भागवत यांच्या विधानाचा समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले ‘मला संघ आणि स्वयंसेवक माहीत आहेत. यांच्यामध्ये होणारी भांडणेदेखील कशी असतात हे माहीत आहे. यांची भांडणे म्हणजे एक म्हणतो ‘ये मला शिव्या येतात मी देईल हां !, तर दुसरा म्हणतो तुला येतात तशा मलाही येतात मीही देईल! आता सैनिकांना काढून हे देशाच्या सीमेवर गेले तर एका बाजूने पाकिस्तान गोळ्या मारेल आणि हे म्हणतील ‘ये नको मारू हा नाहीतर मी पण मारेल!, यावरूनच हा देश कोठे चालला आहे, हे दिसत आहे.