भाजपाकडून शिवसेनेला कुठलाही प्रस्ताव नाही: संजय राऊत

0

मुंबईः राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपा, सेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्री पदावरून युती तोडण्यात आली आहे. एनडीए मधून शिवसेनेला बाहेर काढण्यात आले आहे. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष मिळून सत्ता स्थापन करत आहे. भाजपाकडून शिवसेनेला भाजपाने शिवसेनेला अडीच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिलेला असल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या बाबत संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले, भाजपाकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव आलेला नाही, मुख्यमंत्रिपद काय आता इंद्रप्रस्थ दिलं तरी माघार घेणार नाही.

५ वर्षांसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असून, येत्या २ दिवसांत अंतिम निर्णय होणार असल्याचेही संजय राऊतांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत ही शिवसैनिकांची इच्छा आहे. महाआघाडीच्या सरकारचं नेतृत्व हे उद्धव ठाकरेंनीच करावं, असं तिन्ही पक्षांचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंच्या नावाला तिन्ही पक्षांनी सहमती दिलेली आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सरकार स्थापण्यासंदर्भात चर्चाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळाली आहे.

परंतु मंत्रिपदांच्या वाटपावर अद्याप स्पष्टता झालेली नाही. शिवसेना नेत्यांशी चर्चा करूनच त्याचा निर्णय घेण्यात येईल. लवकरच शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संयुक्त बैठक होणार असून, तिन्ही पक्षांकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 14 व काँग्रेसचे 12 मंत्री असतील, अशी शक्यता आहे. शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. पण राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा होताच राज्यपालांना भेटण्याचा शिवसेनेचा इरादा असल्या