कोलंबो । दुसर्या कसोटी सामन्यातही भारताने आपली चुरस श्रीलंकेला दाखवून दिली. पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे दुसर्या कसोटीतही भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेविरोधात धावांवर धावा काढून धवांचा अक्षरशः ढीगच तयार केला. टीम इंडियाने 9 बाद 622 धावांवर डाव घोषित केला आहे. दुसर्या दिवशीही भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना अजिबात दाद दिली नाही. शतकवीर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा लवकर माघारी परतल्यानंतर वृद्धीमान सहा, अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके फटकावली. त्यामुळे भारताला 600 धावांचा टप्पा ओलांडता आला. या तिघांनी उपयुक्त भागीदार्या रचल्या. सहा 67, अश्विनने 54 धावा केल्या. जडेजाने नाबाद 70 धावा केल्या. यामुळे भारताबाबत संपूर्ण क्रिकेट चाहत्यांकडून वाहवा ऐकिवात येत आहे.
सचिननंतर पुजाराच
यापूर्वीच्या कसोटी डावांमध्ये त्याने 17, 92, 202, 57 व 153 धावांच्या खेळी केल्या आहेत. पुजारा सचिननंतर श्रीलंकेविरुद्ध सलग तीन शतके ठोकणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला. गेल्या मोसमातील निराशाजनक कामगिरीनंतर सूर गवसलेल्या रहाणेने नववे कसोटी शतक पूर्ण केले. पुनरागमन करणारा लोकेश राहुल (57 धावा) आणि विराट कोहली (13 धावा) उपाहारानंतर बाद झाल्यावर पुजारा व रहाणे यांनी नाबाद द्विशतकी भागीदारी केली.
फअश्विनचे विक्रम
गेल्या दहा दिवसांत अश्विनने सर रिचर्ड हेडलीचा विक्रम दोन वेळा तोडला आहे. लंकेविरुद्ध 26 जुलै रोजी पहिल्या कसोटी सामना खेळला. हा अश्विनचा 50 वा कसोटी सामना होता. 50 कसोटीध्ये 275+ विकेट घेण्याचा विक्रम या वेळी त्याने आपल्या नावावर केला. हा विक्रम सर रिचर्ड हेडली यांच्या नावावर होता. हेडली यांनी 36 वषार्ंपूर्वी 1981मध्ये 50 व्या कसोटी सामन्यात 262 विकेट घेतले होते. अश्विनने 51 कसोटीमध्ये 281 विकेट घेतल्या आहेत. या साठी हेडली यांना 58 कसोटी सामने खेळावे लागले होते.
भारताची मोठी मजल
खेळाला सुरुवात झाल्यानंतर कालच्या धावसंख्येत आणखी 6 धावांची भर घातल्यानंतर 350 धावांवर चेतेश्वर पुजाराच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 217 धावांची भागीदारी केली. 133 धावांवर पूजाराला करुणारत्नेने पायचीत केले. त्यानंतर रहाणे बाद झाला. 132 धावांवर रहाणेला पुष्पकुमाराने डिकवेलाकरवी झेलबाद केले. आता अश्विन आणि वृद्धीमान सहाची जोडी मैदानावर आहे. गेल्या लढतीत शतकी खेळी करणारा पुजारा 50 वा कसोटी सामना खेळत आहे. त्याची कालच प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. सौराष्ट्रच्या या फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये कारकिर्दीतील 13 वे शतक झळकावले. मालिकेत सलग दुसर्यांदा शतक झळकावणार्या पुजाराने चार हजार धावांचा पल्ला गाठला.
अजिंक्य रहाणेने शतक
श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या कसोटीत चेतेश्वर पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेने शतक झळकावून भारतीय क्रिकेटप्रेमींचा आनंद द्विगुणित केला. पण, त्याचे हे कारकिर्दीतले नववे शतक साजरे झाले, तेव्हा त्याच्या बायकोच्या – राधिकाच्या चेहर्यावरचे भाव पाहण्यासारखे होते.