भारताचे आयसीसी क्रमवारीत प्रथम स्थान भक्कम

0

शिमला। भारताने कांगारूचा 2-1 ने पराभव केला.या विजयामुळे भारताचे कसोटी गुण 122 झाले आहे. त्यामुळे भारत अव्वल स्थानी आल आहे.तर भारत व दुसर्‍या देशातील संघात 12 गुणांचा फरक असल्यामुळे भारताचे आयसीसी क्रमवारीतील प्रथम स्थान भक्कम झाले आहे. कसोटी संघांमध्ये भारत सध्या 122 गुणांसह पहिल्या तर ऑस्ट्रेलिया 108 गुणांसह दुसर्‍या आणि दक्षिण आफ्रिका 107 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे.

19 महिन्यात सलग सातव्यांदा मालिका विजय
त्याखालोखाल इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडीजचा क्रमांक लागतो.अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने धर्मशाला वन डेत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून, कसोटी मालिकेत विजयाची गुढी उभारली. भारताने बॉर्डर-गावसकर मालिका 2-1 ने जिंकली.टीम इंडियाने 19 महिन्यात सलग सातव्यांदा मालिका विजय मिळवला आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमाअखेरीस भारताने अव्वल स्थान कायम राखले आहे.मोसमाअखेरीस आयसीसीची कसोटीतील अव्वल स्थानासाठीची गदाही भारताचा कर्णधार विराट कोहलीला प्रदान करण्यात आली. तसेच टीम इंडियाला आयसीसीकडून दहा लाख अमेरिकन डॉलर्सचे इनामही मिळाले आहे.आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये सामील असलेले सुनील गावसकर यांनी विराट कोहलीला गदा आणि चेक सुपूर्द केला.