भारतात ऑनलाईन ई-फार्मसी बेकायदेशीर

0

जळगाव । भारतासारख्या देशाने प्रगत देशांची बरोबरी करतांना आपल्याकडे असलेल्या उणीवांची गंभीर दखल घेऊन त्यावरील उपाय याचा विचार करुन ऑनलाईन फार्मसी व ई- पोर्टल सारख्य बाबींचा विचार करणे योग्य होईल. सद्यस्थितीत वरील सर्व बाबींची पुर्तता करणे शक्य नसून ते बेकायदेशीर आहे. त्या दृष्टीने पाऊले उचलणे गरजेचे असून, परकिय चलनाची गुंतवणूक अथवा स्पर्धाकक व्यवसायिक व्यवस्था यापेक्षाही सामान्य जनतेने आरोग्य जास्त महत्त्वपूर्ण आहे. देशभरातील 8 लाख औषधी विक्रेते ऑनलाईन फार्मसीच्या केंद्र सरकारच्या पब्लिक नोटीस विरोधात मंगळवार 30 मे रोजी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे राज्यसंघटनेच्या बैठकी दरम्यान अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी बोलताना घोषणा केली.

600 केमिस्ट पदाधिकार्‍यांची उपस्थिती
महाराष्ट्र राज्य केमिस्ट अ‍ॅन्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्या राज्यकार्यकारिणी सभेचे आयोजन बुधवारी 24 मे रोजी जळगाव येथील केमिस्ट भवन येथे करण्यात आले होते. या सभेचे आयोजन जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर्स संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातील अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकार्‍यारी सहभागी झाले होते. सुमारे 600 केमिस्ट पदाधिकारी राज्यसभे दरम्यान सहभागी झाले होते. यावेळी देशातून आणि राज्यातून आलेल्या मान्यवरांनी जीएसटी,ई-फार्मसी आधी विषयावर मनोगत व्यक्त केले.

सायबर क्राईमचा मोठा धोका
औषधांच्या दुष्परिणामांपासून सामान्य जनतेस वाचिवणे, कमी दर्जाच्या अप्रमाणित, डुप्लीकेट औषधांच्या शिरकावाची दाट शक्यता, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अ‍ॅन्टीबायोटिक्स, वेदनाशामक अथवा अन्य औषधांच्या वापरास चालना मिळणे तसेच युवकांमध्ये नशेच्या औषधांच्या वापराचा मोठा धोका निर्माण होणे,ग्रामीण भारतात जीवनरक्षक औषधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून देशातील 8 लाख औषध व्रिक्रेते व 40 लाख कर्मचार्‍यांच्या परिवारावर आर्थिक संकट, सक्षम प्रशासकीय यंत्रणेच्या मोठा प्रमाणात अभाव आहे. अ‍ॅलोपॅथी औषधांच्या वापरावर सक्षम डॉक्टरांच्या मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. अपूर्ण यंत्रणा व मनुष्यबळ याचा फायदा उचलून सायबर क्राईमचा मोठा धोका, इंटरनेट नेटवर्क, इलेक्ट्रीसीटी यासारख्या सुविधांमध्ये येणार्या दैनंदिन अडचणी यासह अनेक महत्त्वाचे मुद्दे गांभीर्याने विचारात घेणे गरजेचे असल्याचे मत संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

यांनी घेतले परिश्रम
राज्य कार्यकारिणीला सभेला यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र महाजन, ब्रजेस जैन, शामकांत वाणी, सुनील महाजन, धनंजय तळेले, श्रीकांत पाटील, चंद्रकांत पाखले, रुपेश चौदरी, संदीप बेदमुथा, प्रदीपभाऊ देशमुख, शैलेश राठोड, संजय तिवारी, ईरफान सालार, नरेंद्र पाटील, अनिरुध्द सरोदे, मोहन भागवानी, पदाधिकारी राजीव चौधरी, साहेबराव भोई, अनिल कोळबे, खलीद सैय्यद, रियाजभाई, वासिम देशमुख, बाळू सोनवणे, दिनेश चौधरी सचिन अग्रवाल, अमिल चांदीवाल, रवि रडे, नंदु पाटील, अविनाश बुधानी, परीमल पाटील, राजेंद्र पाटील, वैभव तायडे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, सचिव व त्यांची कार्यकारिणी आदींनी परिश्रम घेतले. सभेचे प्रासंगिक सूत्रसंचलन अयाज मोहसीन यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव अनिल झंवर यांनी केले.

प्रशानाच्या दुर्लक्षामुळे आंदोलनात्मक भूमिका
राज्यात ई-फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशीर व्यवसाय सुरू असून याद्वारे नार्कोटीक्स, ड्रग्ज, झोपेची औषधी गर्भपाताच्या गोळ्या, कोडीन सिरप यासारख्या अनेक धोकादायक औषधांची विक्री सुरू असल्याचे शासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेले आहे. प्रशासनाच्या याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान ऑनलाईन औषधी विक्रीबाबत अनेकवेळा गंभीर चिंता व्यक्त केल्यावरही राज्य व प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सरकार देशात ई-फार्मसी व ई-पोर्टल लागू करण्याची योजना आखत असल्यामुळे देशातील व राज्यातील औषध विक्रेत्यांनी आंदोलनात्मक भुमिका घेतली आहे.

ऑनलाईन विरोधात रणशिंग
अखिल भारतीय औषधी विक्रेतांच्या संघटनेने संपूर्ण भारतात व राज्यात बेकायदेशीररित्या चालविल्या जाणार्या ऑनलाईन फार्मसी व केंद्र सरकारच्या स्वास्थ व कुटूंब कल्याण, मंत्रालयाद्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या पब्लिक नोटीसच्या विरोधात मंगळवार दि. 30 मे रोजी संपूर्ण देशात बंदचे आवाहन केले आहे. राज्य केमिस्ट संघटनेने 55 हजार औषध विक्रेते या बंदमध्ये याबंद मध्ये सहभागी होतील, अशी माहिती राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी कार्यकरिणी सभेत बोलतांना दिली.