भारत दुसऱ्यादिवसअखेर 6 बाद 248 धावा

0

धरमशाला : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताने दिवसअखेर 6 बाद 248 इतक्या धावा केल्या. लोकेश राहुल 60 आणि चेतेश्वर पुजाराने 57 धावांची खेळी खेळल्याने भारताचा डाव सावरला. कर्णधार अजिंक्य रहाणेचं अर्धशतक तर केवळ चार धावांनी हुकले. आर. अश्विनला 30 धावा करता आल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वृद्धिमन साहा 10 आणि रविंद्र जडेजा 16 धावांवर खेळत होते.

भारत अद्यापही पहिल्या डावात 52 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 4 गडी शिल्लक आहेत. पण या कसोटीच्या पहिल्या डावात आघाडी मिळवण्यासाठी टीम इंडियाचा संघर्ष अजूनही सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथनच्या फिरकीच्या जाळ्यात भारताचे फलंदाज अडकले आणि भारताचा निम्मा संघ दुसऱ्या दिवशी गारद झाला. नॅथनने 4 बळी मिळवत भारताच्या डावाला सुरुंग लावला.