ढाका । चॅम्पियन ट्रॉफीच्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशावर 240 धावांनी नोंदविला होता.आता पुन्हा उपात्य सामन्यात पुन्हा देान्ही संघ आमनेसामने भिडणार आहे.त्यापुर्वीच बांगलादेशाच्या समर्थकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टर्स टाकून उच्छाद मांडला आहे. यात भारतीय तिरंग्याचा अवमान करणारे पोस्टर्स बांगलादेशी चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.त्यामुळे सामना होण्यापुर्वीच बांगलादेशाच्या चाहत्यांनी याला वेगळेच वळण देतांना दिसत आहे.
धोनी बरोबरही झाले आहे
चॅम्पियन्स ट्रॉफीत 15 जूनला भारत विरुद्ध बांगलादेश सेमीफायनल होणार आहे. भारताची फलंदाजी व क्षेत्ररक्षण मजबुत झाले असून त्यावरूनही गोलंदाजानी जे कामल केली आहे.त्यामुळे चांगल्या चांगल्या फलंदाजांना अडकविण्यात यशस्वी झाले आहे.याचजोरावर बलाढ्या दक्षिण अफ्रिकेला पराभूत केेले. बांगलादेश व भारत याच्यातील सेमीफायनल पुर्वीच बांगलादेशी चाहत्यांनी पुन्हा एकदा लायकी दाखवत आक्षेपार्ह पोस्टर्स शेअर केले आहेत.आशिया कप दरम्यानही बांगलादेशी चाहत्यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे आक्षेपार्ह पोस्टर व्हायरल केले होते. मात्र टीम इंडियाने त्या सामन्यात बांगलादेशला पराभवाची धूळ चारुन पोस्टरला चोख उत्तर दिले होते.मिरपूरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या त्याच प्रसंगाची पुनरावृत्ती बांगलादेशी चाहते करु इच्छित आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण बांगलादेशच्या या बालिशपणाला भारतीय संघ आपल्या कामगिरीतून देईल.
भारताने 82 टक्के सामने जिंकले
बांगलादेशची ही आयसीसी टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये जाण्याची पहिलीच वेळ आहे. टीम इंडियाने ब गटातून दोन विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक मारली. तर बांगलादेशने एक विजय मिळवला आणि दुसरा संघ बाहेर गेल्याने सेमीफायनलचे स्वप्न पूर्ण झाले. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला, ज्याचा फायदा बांगलादेशला झाला.टीम इंडियाने बांगलादेशला गेल्या वर्षी दोन टी-20 सामन्यांमध्ये पराभवाची धूळ चारली आहे. तर वन डेमध्ये बांगलादेशविरुद्ध भारताने 82 टक्के सामने जिंकले आहेत.