भारत वि. न्यूझीलंड कसोटी मालिका: पहिल्याच दिवशी भारतीय संघाची वाईट अवस्था; २६३ वर संघ बाद !

0

हॅमिल्टन : भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी-२० त्यानंतर वनडे आणि आता कसोटी मालिका सुरु आहे. टी-२० मालिकेत भारतीय संघाने न्यूझीलंडला त्याच्याच भूमीत व्हाईट वॉश दिला होता. त्याचा बदल न्यूझीलंड संघाने वनडे मालिकेत घेतला. वनडे मालिकेत भारतीय संघाला व्हाईट वॉश देऊन न्यूझीलंडने मालिका जिंकली. आजपासून कसोटी मालिका सुरु झाली आहे. कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियावर २६३ धावांमध्ये ऑल आऊट होण्याची वेळ आली आहे. दोन फलंदाजांचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे २६३ वर पूर्ण संघाला थांबावे लागले. हनुमा विहारीने शतक आणि चेतेश्वर पुजाराने ९३ धावा केल्यामुळेच भारतीय संघाला ही सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा तो चांगलाच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात सपशेल अपयश आले आहे.

या सामन्यात पृथ्वी शॉ ही भोपळाही फोडू शकला नाही तर सलामीवीर मयांक अगरवालला एकाच धावावर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर शुबमन गिल, वृद्धिमान साहा आणि आर. अश्विन हे शून्यावर तंबूत परतले. मयांक आणि पुजारा यांची यावेळी भारताचा डाव सावरला. मयांकने १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर १०१ धावा केल्या. शतकानंतर त्याला निवृत्ती घ्यावी लागली. पुजाराने ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ९३ धावा केल्या, त्याचे शतक फक्त सात धावांनी हुकले. आता भारताचा संघ सराव सामन्यात न्यूझीलंड इलेव्हन संघाला किती धावांत तंबूत पाठवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.