भीमा-कोरेगाव प्रकरण: राज्य सरकारही समांतर चौकशी करणार !

0

मुंबई: भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. यावरून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय चुकल्याचेही पवारांनी सांगितले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्य सरकार या प्रकरणाची समांतर चौकशी करणार आहे. त्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख लवकरच याबाबत निर्णय घेतील, असे सांगितले.