भुसावळ : हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सोमवारी पहाटे एक वाजता 36 दरवाजे उघडण्यात आले तीन हजार 508 क्यूमेक्स प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. तापी नदीला पूर आला असून प्रशासनाने तापी काठावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, भुसावळात सोमवारी पहाटे तीन वाजेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाऊस मुक्कामी होता. शहरातील रस्ते आधीच जर्जर झाले असताना पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले.
हतनूरचे 36 दरवाजे उघडले
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात तब्बल 166 मिलीमीटर पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढतच आहे. रविवारी 24 गेट पूर्णपणे उघडण्यात आल्यारनंतर सोमवारी पहाटे एक वाजता एकूण 36 गेट पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. धरणातून प्रति सेकंद 3508 क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. गेल्या 24 तासात बर्हाणपूर येथे 12.2, देडतलाई .32, टेक्सा 24.4, एरडी 9.6, गोपालखेडा 12.8, चिखलदरा 55.4 व लखपुरी 9.6 तर लोहारा येथे 10.2 मिलीमीटर पाऊस झाल्याचे सूत्रांनी सांगितले.