पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजनांवर भर ; वीज कंपनीतर्फे ट्री कटींग
भुसावळ- पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजनांसाठी वीज कंपनीने कंबर कसली असून शुक्रवारी शहरातील न्यायालय फिडरवर वीज तारांना स्पर्श करणार्या झाडांच्या फांद्या छाटण्याच्या कामासाठी दुपारी 12 ते 3.30 वाजेदरम्यान वीजपुरवठा बंद केल्याने शहरवासीया घामाच्या धारांनी चिंब झाले होते. हनुमान जयंतीची सुटी आल्याने शासकीय कार्यालये बंद असल्याने वीज कंपनीतर्फे ही कामे करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
रणरणत्या उन्हात घामाच्या धारांनी शहरवासी चिंब
उन्हाळा सुरू झाल्याने आधीच शहराचे तापमान 44 अंशावर पोहोचले असताना अचानक वीज गुल झाल्याने शहरवासीयांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागला. शुक्रवारी महावितरण कंपनीने दुपारी 12 ते साडेतीन वाजेदरम्यान तापीनगर सबस्टेशनच्या अंतर्गत येणार्या न्यायालय फिडरवर वीज तारांना स्पर्श करणार्या झाडांच्या फांद्या छाटल्या. परीणामी यावलरोड, शांतीनगरचा काही भाग, न्यायालयाच्या परीसरातील भाग, साईचंद्र नगर, राधास्वामी संकूल परिसर, तहसील कार्यालय भाग, गरुड प्लॉट, म्युनिसीपल पार्क, सातारे परीसरातील काही भाग, गवडी वाडा, दामू कुंभार वाड्याचा काही भाग आदी ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. दरम्यान, सकाळीच वीज कंपनीने दुरुस्तीचे कामे करावीत, असादेखील नागरीकांचा सूर आहे.