मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुटी किंवा दोन तासांची सवलत देण्यात येणार असून, या संदर्भात शासनाने आदेश काढले आहेत.
मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते. यंदाच्या निवडणुकीतही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणार्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकानांमधील कर्मचारी, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापारी, औद्योगिक उपक्रम, खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी किंवा इतर आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स आदींमधील कर्मचार्यांना भरपगारी सुटी किंवा अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकार्यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी केवळ दोन, तीन तासांची सवलत देण्यात यावी, असे आदेश निवडणूक आयोगाने काढले आहेत.
हे देखील वाचा