मुंबई: मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीत घेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करण्याकरिता मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या गेल्या २ दिवसांत ३ बैठका झाल्या. या उपसमितीने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने अहवाल दिला. या सर्व शिफारसी सरकारने हिवाळी अधिवेशनाआधी झालेल्या बैठकीत स्वीकारल्या. मात्र समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचे, यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली.