महानगरपालिकांसाठी 9,199 उमेदवार रिंगणात

0

मुंबई । राज्यातील 10 महानगरपालिकांच्या 1 हजार 268 जागांसाठी 9 हजार 199 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत; तसेच पहिल्या टप्प्यात निवडणूक होणार्‍या 15 जिल्हा परिषदेच्या 855 जागांसाठी 4 हजार 278; तर 165 पंचायत समित्यांच्या एकूण 1 हजार 712 जागांसाठी 7 हजार 693 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.असे राज्यातील महापालिका,जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानात एकुण 16 हजार 892 उमेदवार रिंगणात आहे. निवडणूक आयोगाने तयारी पुर्ण केलेली आहे.

16 रोजी 15 जि.प. व त्यांतर्गतच्या 165 पंचायत समित्यांसाठी मतदान

राज्यातील 10 महानगरपालिकांसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 16 फेब्रुवारी 2017 रोजी 15 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 165 पंचायत समित्यांसाठी मतदान होईल. मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी 23 फेब्रुवारी 2017 रोजी होईल. दुसर्‍या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदांच्या 654 जागासांठी छाननीनंतर 6 हजार 367 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. 118 पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 10 हजार 879 नामनिर्देनशपत्रे वैध ठरली आहेत. नामनिर्देशनपत्रांच्या माघारीच्या अंतिम मुदतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. ही मुदत निवडणूक निर्णय अधिकार्‍याच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 13 फेब्रुवारी 2017; तर अपील असलेल्या ठिकाणी 15 फेब्रुवारी 2017 पर्यंत असेल. महानगरपालिकानिहाय उमेदवारांची संख्या: बहन्मुंबई (227)- 2,271, ठाणे (131)- 1,134, उल्हासनगर (78)- 821, नाशिक (122)- 1,089, पुणे (162)- 623, पिंपरी-चिंचवड (128)- 804, सोलापूर (102)- 478, अकोला (80)- 579, अमरावती (87)- 626 आणि नागपूर (151)- 774. एकूण (1,268)- 9,199. पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदनिहाय उमेदवारांची संख्या: अहमदनगर (72)- 303, औरंगाबाद (62)- 323, बीड (60)- 440, बुलडाणा (60)- 333, चंद्रपूर (56)- 314, गडचिरोली (35)- 176, हिंगोली (52)- 245, जळगांव (67)- 244, जालना (56)- 266, लातूर (58)- 231, नांदेड (63)- 374, उस्मानाबाद (55)- 254, परभणी (54)- 276, वर्धा (50)- 293 आणि यवतमाळ (55)- 306. एकूण जागा (855)- 4,278. या जिल्हा परिषदांतर्गतच्या 165 पंचायत समित्या (1712)- 7,693.