शिवसेनेचे नितीन लढ्ढा यांची स्थायी सभेत आक्रमक भूमिका ; निर्णय होवूनही कार्यवाही होत नसल्याने सभागृहाचा प्रशासनाकडून अपमान
जळगाव- महापालिकेची आर्थिक परिस्थीती वाईट आहे. परंतू ऐककीडे 335 कोटी रुपये गाळेधारकांकडे 2012 पासून थकीत. तसेच चार प्रभागातील मालमत्तांकराचे 30 कोटी, घरकुलाचे 9 कोटी 12 लाख, खुला भुखंडाचे 38 कोटी 72 लाख रुपये 31 मार्च 2019 पर्यंत असे एकून 450 कोटी रुपये थकलेले आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती अंत्यत बिकट असतांनाही महापालिकेकडून तिजोरी भरण्याचा का विचार केला जात नाही, एकतर 450 कोटींची थकबाकही वसूल करा अन्यथा निर्लेखित तरी करा, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेचे सदस्य नितीन लढ्ढा यांनी शनिवारी स्थायी समितीच्या सभेत घेतली.
स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार, नगरससचिव सुनील गोराणे उपस्थित होते.
कर्जफेडीचे धोरण ठरले होते सभागृहात
तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर असतांना चर्चे दरम्यान गाळेधारकांकडून 22 गाळ्यांचे भाडे वसुल केले होते. या पैशातून अग्निशमन व जळगाव जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज फेडण्याचा धोरण सभागृहातत ठरले आहे. परंतू प्रशासानाने हे केले नसून सभागृहाचा एक प्रकारे अपमान केला आहे. तसेच महापालिकेची आर्थिक अवस्था वाईट असतांना ऐकीकडे 450 कोटी रुपयांची असलेली थकबाकी महापालिका प्रशासन का वसुल करत नाही. एकतर महापालिकेने कारवाई करावी किंवा ही थकबाकी मनपाच्या अधिनीयम 152 प्रमाणे निर्लेखीत करावी अशी मागणी यावेळी केली. तसेच विषयापत्रकेवरील 13 व जोडपत्रावरील विषयांना मान्यता देण्यात आली.
शिवसेना, एमआयएमचा विरोध!
घनकचरा प्रकल्पाला मंजूरी मिळून दीड वर्ष होवून केवळ वाहने खरेदीचे काम झाले आहे. परंतू सर्वात आधी घनकचरा प्रकल्प उभा करणे व घनकचरा प्रकल्पा जवळ साचलेला कचरा बायोमानीय करण्याला प्राधान्य देणे आवश्यक होते. परंतू मनपा प्रशासानाचे दुसर्या गोष्टींना प्राधान्य दिसत आहे. आधी ज्या प्रमाणे कचरा संकलन होते तोच आता नविन स्वच्छतेचा ठेकेदार काम करणार आहे. त्यामुळे अतिरिक्त बोजा मनपाच्या तिजोरीवर पडणार आहे. घनकचरा प्रकल्पाच्या बाकी असलेल्या निविदांना तीन ते चार महिन्याचा कालावधी लागेल. त्यानंतर या मक्तेदाराला काम सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी सुचना मांडत एकमुस्तच्या दैनंदिन स्वच्छतेबाबतच्या खर्चा प्रस्तावार शिवसेना व एमआयम यांनी विरोध दर्शविला.
अग्निशन विभागाची वाईट अवस्था
अग्निशमन विभागाची अत्यंत वाईट अवस्था असून केवळ दोन बंबावर शहाराची सुरक्षा अवलंबुन आहे. नविन चार गाड्या घेतल्या असून त्यांची बॉडीबसविण्याची 1 वर्षापासून का पडलेले आहे असा प्रश्न लढ्ढा यांनी उपस्थित केला. यावर वाहन विभाग प्रमुख श्री पाटील यांनी बाजारभाव पेक्षा अधिक दर असल्याने त्या प्रक्रिया थांबलेली आहे. यावर स्थायी सभापतींनी तत्काळ निविदा प्रक्रिया पाडावी असेही ते म्हणाले.