महामार्गाला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांना नोटीसा

0

नाशिक। शेतकर्‍यांनी नाशिक जिल्ह्यातील 42 शेतकर्‍यांना विशेष कार्यकारी दंडाधिकार्‍याकडून नोटीस बजावण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी प्रस्तावित मुंबई -नागपूर समृध्दी या महामार्गाला जमिनी देण्यास विरोध केला आहे.सर्वेक्षणाच्या कामात अडथळा टाकल्याने तुमच्यावर कारवाई का करु नये?, असे या नोटीसमधून विचारण्यात आलेय. विशेष म्हणजे शेतकर्‍यांनी या नोटीसा स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या बोर्डवर या नोटीसा लावण्यात आल्या आहेत. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. यासाठी प्रशासनाने भूसंपादक सुरू केले आहे.या प्रकल्पासाठी जमिनी देण्यासाठी नाशिक मधील 42 शेतकर्‍यांनी विरोध केला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांना नोटीस बजावल्या आहे.त्या घेतल्यनाही म्हणून नोटीस बोर्डावर लावल्या.या नोटिसीनंतर आता हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत.

भूसंपादन करण्यास सुरुवात
याआधी नाशिक जिल्ह्यातल्या 50 पेक्षा अधिक गावांनी जमीन देण्यास विरोध केला आहे. तसेच 26 एप्रिलला शहापूरमध्ये मोठे जनआंदोलन करणार असल्याची घोषणाही आंदोलक शेतकर्‍यांनी केली आहे. या महामार्गासाठी सरकारने भूमीसंपादन करण्यास सुरुवात केली आहे. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. याआधीही नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला विरोध करणार्‍या जमीन मालकांना कल्याण, भिवंडी आणि शहापूर प्रशासनाने चॅप्टर नोटीसा बजावल्या होत्या. या नोटीसांद्वारे सर्व जमीन मालकांना प्रशासनाने बोलावणे धाडले होते.जमीन मालकांशी समोरासमोर चर्चा करुन हा महामार्ग कसा फायद्याचा आहे, हे समजावून सांगण्याचा प्रशासनाचा उद्देश होता. पण दुसरीकडे अशा नोटीसांना केराची टोपली दाखवत जमीन मालकांनी मात्र या आमंत्रणाला धुडकावून लावले .