मुंबई:सतराव्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज देशभरात १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांमध्ये झाले. महराष्ट्रात पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील सात जागांसाठी मतदान झाले. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी शांततेत मतदान पार पडले. ९१ मतदारसंघात १.७ लाख मतदान केंद्रांवर मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांची माहिती.
महराष्ट्रात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वर्ध्यात ५५.३६ टक्के, रामटेकमध्ये ५१.७२ टक्के, नागपूरमध्ये ५३.१३ टक्के, भंडारा-गोंदियात ६०.५० टक्के, गडचिरोली-चिमूर ६१.३३ टक्के, चंद्रपूर ५५.९७ टक्के आणि यवतमाळ-वाशीममध्ये ५३.९७ टक्के मतदान झाले
संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तेलंगणमध्ये ६०.५७ टक्के, मेघालयात ६२ टक्के, उत्तर प्रदेशात ५८.७७ टक्के मणिपूर ७८ टक्के, बिहार ५०.२६ टक्के लक्षद्वीप ६५.९ टक्के आणि असाममध्ये ६८ टक्के मतदान झाले