माता-भगिनींमधील शौर्य जागृत झाल्यावरच खर्‍या अर्थाने महिला सबलीकरण होईल ! – सनातन संस्था.


     मुंबई – देशात महिलांवरील वाढत्या अत्याचारांमागे विविध कारणे आहेतयांत चित्रपटांच्या माध्यमांतून प्रसारित होत असलेली वासनांधता आणि अश्‍लीलता हे एक प्रमुख कारण आहेवर्ष 2021 या एका वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या 31 सहस्र घटना घडल्याअर्थात प्रतिदिन 84 अत्याचाराच्या घटना घडल्याहे अतिशय दुर्दैवी आहेभारताला शूरलढवय्या अशा क्रांतीकारक महिलांचा मोठा वारसा लाभला आहेआपल्या माताभगिनींमधील शौर्य जागृत झाल्यावरच खर्‍या अर्थाने महिला सबलीकरण होऊ शकतेशौर्यजागरणासाठी आणि महिलांवर होणार्‍या अत्याचारांना रोखण्यासाठी आता महिलांनी स्वतप्रशिक्षण घेऊन स्वरक्षणासाठी सक्षम व्हायला हवेअसे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक संत सद्गुरु (सुश्रीस्वाती खाडये यांनी केलेसनातन संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘महिलांचे सबलीकरण व्हावे आणि भारतीय संस्कृतीत महिलांना असलेले श्रेष्ठत्व पुनर्स्थापित व्हावे’या उद्देशाने जागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘जागर स्त्रीशक्तीचा’ या ‘ऑनलाईन’ व्याख्यानात त्या बोलत होत्याहा कार्यक्रम सनातन संस्थेच्या ‘युट्यूब’ चॅनलद्वारे 13 सहस्रांहून अधिक दर्शकांनी पाहिला.

     सद्गुरु (सुश्रीस्वाती खाडये पुढे म्हणाल्या कीछत्रपती शहाजीराजे यांच्या अनुपस्थितीत राजमाता जिजाऊ यांनी सर्व राज्यकारभार पाहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘हिंदवी स्वराज्य’ निर्मितीचे संस्कार केलेजर घराघरांत राजमाता जिजाऊ निर्माण झाल्यातर त्यांच्या पोटी घराघरांत शिवरायच जन्माला येतीलधर्माचरणाविषयी मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या कीकपाळावर कुंकू लावल्याने आज्ञाचक्रात स्थित दुर्गादेवीचे तत्त्व जागृती होतेसात्त्विक पोशाख परिधान केल्याने आध्यात्मिक संरक्षण कवच निर्माण होतेअसे शास्त्र सांगतेधर्माचरण करून दुर्गातत्त्वाचा आणि आध्यात्मिक शक्तीचा लाभ घ्याभारतीय संस्कृतीचा आणि परंपरांचा सार्थ अभिमान बाळगा !

      या कार्यक्रमाला दर्शकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालासहस्रो महिलांनी ‘व्याख्यान अतिशय प्रेरणादायी होते’, ‘अशी व्याख्याने वारंवार व्हायला हवीत’ अशा कमेंटस् कमेंट बॉक्समध्ये केल्या.