मुंबई । रेल्वेने मुंबईतील लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या चारही मार्गांवरील लोकलसेवा २२ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. याबाबत रेल्वे बोर्डाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
जनता कर्फ्यू असल्याने आज मुंबईतील लोकलच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. केवळ ६० टक्केच लोकल धावत आहेत. रात्री १२ नंतर लोकलसेवा पूर्णपणे बंद करण्यात येईल. रेल्वेने सर्व प्रकारच्या प्रवासी गाड्या ३१ मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. लोकल बंद करण्यासंदर्भात राज्य सरकारने वारंवार इशारा दिला होता. त्यानंतर रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे.