जळगाव : गांधी जयंतीनिमित्त ५ हजार ७०० सौरदिव्यांची निर्मिती करून ती उजळविण्याचा मुंबईतील इंडियन इन्स्टीट्युट आॅफ टेक्नॉनॉजी महाविद्यालयाने केलेल्या विश्वविक्रमात जळगावातील लीड इंडिया-२०२० ग्रुपचा सदस्य अमन श्रीवास्तव याने सहभाग नोंदविला होता़ अमने याने प्रा़चेतनसिंग सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली अमने याने विद्यार्थ्यांना सौरदिवे निर्मिती करण्यासह उजळविण्यास विद्याद्यार्थ्यांना मदत केली. त्याच्या या यशाला देशभरातून कौतुक केले जात आहे.