मुख्यमंत्र्यांचा भाजपापासून सावध राहण्याचा इशारा

0

मुंबई: ३० डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांचा मंत्री मंडळ विस्तार पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर नव्या मन्त्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन मंत्र्यासोबत सवांद साधला. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांना भाजपा पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. भाजपाकडून सरकार, तसेच नव्या मंत्र्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या जाळ्यात अडकू नका असा सल्लाही मुख्यमंत्री यांच्याकडून देण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीदरम्यान, आपले विचार जरी भिन्न असले तरी आमची आघाडी एक आहे. लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे. त्यामुळे आपण एकत्रित येवून लोकांचे प्रश्न सोडवू. मतभिन्नता असली तरी आपण एका परिवारासारखे काम करणार आहोत. आपल्याला राज्याचा विचार करायचा आहे, हे लक्षात ठेवण्याचे मंत्र्यांना सांगितले.

अजित पवार यांनी भाजपाकडून या पूर्वी खूप अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपासोबत नीपटण्यासाठी आपण सक्षम आहोत. तुम्ही मंत्री आहात, मन्त्र्यासारखे वागा. सरकारी गोष्टींवरून आक्रमक न होण्याचा सल्ला त्यांनी या बैठकीदरम्यान मंत्र्यांना दिला.