मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचे दुकान उघडावे – निलेश राणे

0

मुंबई – औरंगाबादमध्ये सामूहिक नमाजासाठी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करुन तीन कर्मचार्‍यांना जखमी केल्याच्या घटनेवरुन भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचे दुकान उघडले पाहिजे, असा टोला राणे यांनी लगावला आहे. तसेच पोलिसांनी किती सहन करायचे? काय मर्यादा आहे की नाही. गुन्हे झाले की दोन-तीन कलमं लावून विषय विसरायचा आणि राज्य सरकार आम्ही कार्यवाही केली सांगून मोकळे (होते), असे ट्विट राणेंनी केले आहे.

बिडकीन येथील औरंगाबाद-पैठण रोडवरील संभाजीनगर मार्गावर असणार्‍या अमिरनगर-प्रकाश नगर येथे सामूहिक नामाजासाठी काही लोक जमले होते. यासंदर्भातील माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील काही पोलीस कर्मचार्‍यांना घेऊन घटनास्थळी पोहचले आणि तेथील लोकांना समजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि दोन हवालदार जखमी झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात पोलिसांनी २७ जणांना अटक केल्याचे समजते. या घटनेवरुन निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.