नवी दिल्ली:समान नागरी कायद्याची आवश्यकता नाही असे मत व्यक्त करून विधि आयोगाने विवाह, घटस्फोट, पुरुष व स्त्रियांचे विवाहाचे वय यात काही बदल करणाऱ्या शिफारशी केल्या आहेत. मुलीचे वय १८ वर्ष व मुलाचे वय २१ वर्ष लग्नासाठी योग्य असल्याचे ठरवून देण्यात आले आहे. मात्र, मुला-मुलीचे लग्नाचे वय १८ वर्षच ठेवा, अशी सुचना विधी आयोगाने केली आहे. लग्नासाठी मुलाचे वय २१ वर्ष आणि मुलीचे वय १८ वर्ष चुकीचे असल्याचेही विधी आयोगाने म्हटले आहे. विधी आयोगाचा कार्यकाल शुक्रवारी संपला.
आयोगाने सल्ला व सूचनावजा अहवाल जारी करताना धर्मस्वातंत्र्य व प्रसाराचा धर्मनिरपेक्ष लोकशाहीतील अधिकार मान्य केला आहे. धार्मिक रूढीच्या नावाखाली तिहेरी तलाक, बालविवाह हे सामाजिक गैरप्रकार मान्य करता येणार नाहीत असेही आयोगाने म्हटले आहे.
विधी आगोयाने समान नागरिक हक्क आणि पर्सनल लॉमध्ये सुधारणा करण्याची सूचना केली आहे. अनेक लोकांशी चर्चा करुन कायदा आणि सामाजिक परिस्थितीच्या पुनरावलोकनच्या आधारावर कायदा आयोगाने म्हटलं आहे. लग्नासाठी मुलाचे वय हे मुलीपेक्षा जास्त असावे असा समज आहे. कायदेशीरत्या १८ वर्ष झाल्यास ती व्यक्ती प्रौढ मानली जाते. त्यामुळे दोघांसाठी लग्नाचे वय वेगळे असणे चुकीचे लग्नासाठी मुलाचे आणि मुलीचे वय १८ वर्ष असे समान असावे असे आयोगाने म्हटलं आहे.