नवी दिल्ली: आज मंगळवार २० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसे राहावे याबाबत मोदी विद्यार्थ्यांना कानमंत्र देत आहेत. सलग तिसऱ्या वर्षी मोदी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे संवाद साधत आहेत. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मोदींनी विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे धडे दिलेत. जीवनात नाराज होऊ नका, नाराजीत कधीही जीवन जगू नका असा सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला. अपयश हा यशातून पुढे जाण्याचा मार्ग असतो असे मोदींनी सांगितले.