यावल (प्रतिनिधी)- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत प्र.प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. ए.पी.पाटील हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.डी.पवार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय व उद्दिष्ट विशद केली.
कार्यक्रमाचे प्रमुख्य वक्ते उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी मार्गदर्शनात आपला भारत देश हा विविध संस्कृती,भाषा,धर्म यांनी नटलेले राष्ट्र आहे. आपण आपल्या राष्ट्राचा अभिमान बाळगून निस्वार्थपणे सेवा केली पाहिजे. युवकांनी सेवा करताना स्वतःला झोकून दिले पाहिजे त्यामुळे इतर युवकांना प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन केले.
उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे खेड्याकडे चला यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊन ग्रामीण भाग स्वावलंबन होईल. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागाची दरी भरून निघेल.तसेच स्वयंसेवकांनी स्वावलंबन व स्वयंशिस्त हे दोन गुण अंगीकारून समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण करणे गरजेचे आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पी.व्ही. रावते यांनी केले तर आभार प्रा.नरेंद्र पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ. एच. जी. भंगाळे,डॉ.पी.व्ही.पावरा प्रा.पी. व्ही.सपकाळे प्रा.प्रा.सि.टी.वसावे, प्रा. सुभाष कामडी,डॉ.संतोष जाधव, प्रा. एन. डी. बोदडे प्रा.अर्जुन गाढे यांनी सहकार्य केले.