जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचे प्रकरण ; सुनावणीकडे राजकीय लोकप्रतिनिधींचे लागले लक्ष
यावल- यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांच्या विरूध्द दाखल अपात्रते प्रकरणी 12 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. कोळी यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावे या संदर्भातील याचिका 31 ऑगस्ट 18 रोजी जिल्हाधिकारींकडे नगरसेवक अतुल पाटील यांनी दाखल केली होती. तर यापूर्वी पालिकेचे दोन नगरसेवक अपात्र झाल्याने नगराध्यक्षांच्या सुनावणी कडे जिल्ह्याचे लक्ष लागलेे आहे.
नगरसेवक अतुल पाटलांची याचिका
शहर विकास आघाडीचे गटनेता अतुल पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार पालिकेत प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष पद हे अनुूुचित जमातीच्या महिलेकरीता राखीव होते. तेव्हा शिवसेनेच्या वतीने सुरेखा शरद कोळी या दिनांक 27 नोंव्हेबर 2016 रोेजी नगराध्यक्ष म्हणून निवडूून आल्या तर कलम 9 (अ) नुसार राखीव जागेवर निवडणूक लढवणार्या उमेदवाराने निवडणूक झाल्याच्या सहा महिन्याच्या आत जातवैद्यता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते मात्र अद्यापपावेतो त्यांनी वैद्यता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने त्यांना अपात्र करण्याची याचिका 31 ऑगस्ट 2018 रोजी अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी किशोेरराजे निंबाळकर यांच्याकडे दाखल केली होती. तेव्हा जिल्हाधिकारींनी या प्रकरणात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या पालिकेच्या मुख्याधिकार्यांकडून या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल मागवला आहे. 12 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी प्राप्त अहवाल व दाखल तक्रार आणी प्रतिवादी नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांचे म्हणणे ऐकून त्यावर सुनावणी ठेवली आहे. तेव्हा या पुर्वीचं पालिकेचे दोन सदस्यांना व्हिप झुगारल्या प्रकरणी 10 ऑक्टोंबरला जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरवले आहे व आता नगराध्यक्षांच्या संदर्भात दाखल अपात्रता प्रकरणी होणार्या सुनावणी कडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा नाही मिळणार फायदा- अतुल पाटील
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णया नुसार ज्या-ज्या लोकप्रतिनिधींनी जातवैद्यता प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या कलावधीत सादर केलेले नव्हते त्यांना अजुन सहा महिने कालावधी वाढवून दिला आहे. असे असले तरी या निर्णयाचा फायदा यावल नगराध्यक्षांना मिळू शकत नाही कारण आजवरदेखील त्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे व निवडणूक होवून 23 महिने उलटले असल्याचे याचिकाकर्ता तथा शहर विकास आघाडीचे गटनेता अतुल पाटील म्हणाले.