यावल । शहरातील विविध शालेय संस्था, विविध रस्त्यावरील हगणदारी परीसरासह सार्वजनिक ठिकाणांची केंद्रीय गुणनियंत्रण समितीतर्फे तृतीयपक्ष निरीक्षणाअंती शहर 100 टक्के हगणदारीमुक्त झाल्याचा अहवाल केंद्रीय समितीने शासनाकडे सादर केला आहे. सोमवार 5 रोजी समितीच्या अहवालाची प्रत प्राप्त होताच नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी नगरसेवकांच्या बैठकीत याबाबतची माहीती दिली. केंद्रीय समितीने शिफारस केल्याने शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीसह पारीतोषिकासाठी पालिका पात्र ठरल्याचे त्यांनी सांगितले. भारत स्वच्छ अभियानांतर्गत केंद्रीय गुणनियंत्रण भारत सरकारतर्फे गुण नियंत्रक विभागाचे वरिष्ठ अधिकारी रवी पवार, कनिष्ठ अधिकारी विशाल सोरडे यांनी शहरात एसटी बसने येवून शहराच्या विविध ठिकाणांची निरीक्षण केले होते. यात इंदिरा गांधी हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा, व्यापारी संकूल, बाजार समिती, विविध वस्त्यांमध्ये जावून वैयक्तीक शौचालयांसह सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली होती.