युतीसाठी नवा गडकरीमार्ग

0

मुंबई : भाजप आणि शिवसेनेला झालें गेलें विसरून एकत्र येण्यावाचून पर्याय नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत गडकरी यांनी मुंबईतील युतीबाबतचे सुतोवाच केले. ते म्हणाले की, शिवसेनेसोबत युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आहे. वैचारिक मतभेत नाहीत निवडणुकीच्या काळात मतभेद झाले असले तरी ते टोकाचे नाहीत म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
ते दोघेे प्रगल्भ नेते आहेत

मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी युतीसाठी कोण पुढाकार घेणार? दोन्ही पक्षांकडून अपक्षांना आपल्या ताफ्यात दाखल करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे महापालिकेत सत्तेची गणित कोण जुळवणार याची उत्सुकता आहे. गडकरी यांनी ‘प्रत्येकालाच आपल्या पक्षाचा महापौर असावा, असे वाटते. मात्र, फडणवीस आणि उद्धव दोघेे प्रगल्भ नेते आहेत. ते योग्य निर्णय घेतील’, असे स्पष्ट केले.

युती तुटण्याला ‘सामना’ जबाबदार

शिवसेना आणि भाजपच्या युती तुटण्याला ‘सामना’ हे सेनेचे मुखपत्र जबाबदार असल्याचेही गडकरींनी सांगितले. भाजप आणि शिवसेना हे दोन वेगळे पक्ष आहेत आणि दोघांनाही आपापली मतें आहेत. पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांबाबत ‘सामना’मध्ये आक्षेपार्ह लिहीले जाते, ते थांबायला हवे. शिवसेना-भाजप युतीमध्ये दरी निर्माण होण्यासाठी ‘सामना’च जबाबदार आहे, असेही गडकरी म्हणाले.