रविचंद्रन अश्‍विनने पूर्ण केले 200 बळीचे द्विशतक

0

बंगळुरू । पुण्याचा वचापा काढीत बंगळुरूच्या कसोटी आर.अश्‍विने आपल्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाला गारद केले.यामुळे भारताला विजयश्रीतर मिळालीच त्याचबरोबर अश्‍विनने 200 बळीचे द्विशतक पुर्ण केले. याचाबरोबर त्याने आपल्या अजुन एक विक्रम केले आहे. अश्विनने आज घरच्या मैदानावर 200 बळींचा टप्पा ओलांडला. त्याबरोबरच तो मायदेशात सर्वात वेगाने 200 बळी पूर्ण करणारा गोलंदाज ठरला आहे.महान गोलंदाज बिशनसिंग बेदी यांना अश्‍विनेने मागे टाकले आहे. अश्विनने या लढतीदरम्यान आपल्या बळींची संख्या 269 वर नेली आहे.

कांगारुंना ओढले फिरकीच्या जाळ्यात
भारताने दिलेल्या धावांचा आज पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघा मैदानात उतरला असता अश्विनने कांगारुंना फिरकीच्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. चहापानापूर्वी अश्विनने एका अप्रतिम चेंडूवर मिचेल स्टार्कचा त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला. त्याबरोबरच वेड हा अश्विनचा घरच्या मैदानावरील 200 वा बळी ठरला. सामन्याअखेर मायदेशातील खेळपट्ट्यांवरील अश्विनच्या खात्यातील बळींची संख्या 202वर पोहोचली आहे.

269 वर नेली बळींची संख्या
47 वी कसोटी खेळत असलेल्या अश्विनने आज सहा बळी टिपत आपल्या बळींची संख्या 269 वर नेली. त्यादरम्यान त्याने सर्वाधिक कसोटी बळी टिपणार्‍या भारतीय गोलंदाजांच्या यादीत बिशनसिंग बेदींना (266 बळी) मागे टाकले. आता केवळ झहीर खान (311), हरभजन सिंग (417), कपिलदेव (434) आणि अनिल कुंबळे (619) हे गोलंदाज अश्विनच्या पुढे आहेत