राज्यातील जलस्त्रोतांचे पुनरूज्जीवन करावे

0

मुंबई – जलयुक्त शिवार अभियान सिंचनाची यशकथा ठरली आहे. शेतीला सिंचनाची व्यवस्था होण्यासाठी भविष्यात राज्यातील नदी, तलाव, कालवे या जलस्त्रोतांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी अभियान हाती घ्यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात 2014सालच्या शेती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालक मंत्री विनोद तावडे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदी यावेळी उपस्थित होते.

लहरी हवामान शेतीपुढील मोठे आव्हान असून त्याला सामोरे जाण्यासाठी हवामान बदलावर आधारित कृषी कार्यक्रम राबविले पाहिजेत. त्यामुले गारपीट, अवकाळी पाऊस, पूर या संकटामुळे शेतीच्या उत्पादनावर होणारा परिणाम कमी करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

पुरस्कारार्थी शासनाचे ‘कृषीदूत’
पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरस्कारार्थी राज्य शासनाचे ‘कृषीदूत’ असल्याचे सांगितले. राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांना आपण केलेल्या प्रयोगांचे मार्गदर्शन करावे. ज्या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या मोठ्या प्रमाणावर आहे तेथे पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी कृषीदुतांची भूमिका बजवावी, असे आवाहन त्यांनी केले.

भाजीपाला उत्पादकांसाठी सावता माळी पुरस्कार
पुरस्कारार्थी शेतकऱ्यांच्या प्रयोगांमुळे कृषी विकासाला चालना मिळाली आहे. पुरस्कारांमध्ये पुढील वर्षापासून भाजीपाला उत्पादन वाढीसाठी सावता माळी पुरस्कार देण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यावेळी केली.

विविध पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार : विश्वासराव आनंदराव पाटील.
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार : दिलीप नारकर, प्रेमानंद महाजन, आनंदराव गाडेकर, मच्चिंद्र कुंभार, आनंदराव मटकर, शेषराव निखाडे, दत्तात्रय गुंडावार.
जीजामाता कृषिभूषण पुरस्कार : माधुरी भोईर, सुनिता रावताळे, वैशाली पवार, विद्या रूद्राक्ष, लक्ष्मीबाई पारवेकर.
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार : व्यंकट कुलकर्णी, चैताली नानोटे.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार : राजेंद्र पाटील, देवेंद्र राऊत, चिंधा पाटील, हिम्मतराव माळी, अंजली घुले, बाळासाहेब काकडे, रमेश जाधव, दत्तात्रय पाटील, आनंदा पाटील, दत्तात्रय चव्हाण, शिवाजी बनकर, व्यंकटी गीते, शिवाजी कन्हेरे, धनंजय घोटाळे, रवींद्र मेटकर, सचिन सारडा, शालिग्राम चाफले, रियाज कन्नोजे, अविनाश कहाते, बाळकृष्ण पऱ्हाड, कल्पनाबाई बागुल, दिगंबर घुटे, मारोती डुकरे, झापू जामूणकर, वडू लेकामी.
उद्यान पंडित पुरस्कार : प्रकाश ठाकूर, सुभाष गुंजाळ, रवींद्र पाटील, गणपत पारटे, भीमराव शेंडगे, दत्तात्रय फटांगरे, पुष्पा खुबाळकर, हिम्मतराव टप्पे.
कृषीभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार : मधुकर मोहपे, नारायण चौधरी, नीता बांदल, प्रदीप निकम, बाळासाहेब जीवरख, नासरी चव्हाण, सुधाकर कुबडे, दिलीप कुलकर्णी, मानस रूरल डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार : विनय आवटे, प्रदीपकुमार अजमेरा, भागीनाथ गायके.