केळीला फटका ; रोझोद्यात घराचे पत्र उडाले
रावेर- रावेर तालुक्यात गुरुवारी दुपारी वादळी वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रणरणत्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांना मोठा दिलासा मिळाला मात्र या वादळी वार्यामुळे रोझोद्यात घराचे पत्रे उडाले तर कुठे केळीचे किरकोळ नुकसान झाल्याचे वृत्त आहे. याची माहिती प्रशासकीय अधिकार्यांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.
नुकसान झालेल्या भागाची पाहणी
तालुक्यातील सावखेडा, विवरे, खिरोदा, चिनावल, भाटखेडा, उटखेडा, खिरोदा या भागात गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे केळीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. खिरोदा मंडळात 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. नुकसान झालेल्या भागाची कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी पाहणी केली.
वादळाने ट्रॉली पलटी, घराचे पत्रेही उडाले
तालुक्यातील उटखेडा, चिनावल परीसरात वादळाचा जोरदार फटका बसला तर रोझोदा येथे घराचे पत्रे उडाली. शेती-शिवार भागात केळीचे नुकसान झाल्याने केळी उत्पादक संकटात सापडले आहेत. वादळामुळे गाड रस्त्याने जाणारी ट्रॅक्टर ट्रॉलीदेखील पलटी झाली मात्र सुदैवाने प्राणहानी टळली. दरम्यान, यावल तालुक्यातील चितोडासह सावखेडा भागातही जोरदार पाऊस झाल्याचे सांगण्यात आले.