नवी दिल्ली । विराट कोहलीचे नेतृत्व करण्याची पध्दत वेगळी आहे.तर रहाणे यांची नेतृत्व करण्याची पध्दती वेगळी आहे.या दोन पध्दतीचे नेतृत्व करणारे कर्णधार एकाच वेळी एकाच संघात असल्याने टीम इंडिया भाग्यवान असून कसोटीत रहाणेने संयमाने नेतृत्व केले, शिवाय दुसर्या डावात आक्र मक फलंदाजी करीत विजयावर शिक्कामोर्तब करून त्याच्या नेतृत्वगुणांचा परिचय घडला.असे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल म्हटले.
‘अजिंक्य रहाणेसारखा संयमी वृत्तीचा कर्णधार उपलब्ध असणे हे टीम इंडियाचे नशीब म्हणावे लागेल. रहाणे स्वत:च्या स्टाईलने संघाचे नेतृत्व करतो, तर कोहलीच्या नेतृत्वाची स्टाईल त्यापेक्षा वेगळी आहे.धरमशाला कसोटीत जखमी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. भारताने ही कसोटी आठ गड्यांनी जिंकून मालिका 2-1 ने खिशात घातली. रहाणेने धरमशाला कसोटीत कर्णधार म्हणून खरोखर उत्कृष्ट कामगिरी केली. खर्या कर्णधाराची नेतृत्वाची पद्धत आपल्यापेक्षा खूप वेगळी असल्याची जेव्हा कल्पना तुम्हाला असते, अशा वेळी त्याची जागा भरून काढण्याचे मोठे आव्हानदेखील असते.असे चॅपेल म्हणाले.
आपण काय करावे? मुख्य कर्णधाराचीच पद्धत कायम ठेवून नेतृत्व करावे, की स्वत:च्या स्टाईलने नेतृत्व करावे, हा प्रश्न असतो. रहाणेने अतिशय सोप्या पद्धतीने सामना पार पाडला. शिवाय जिंकून दाखविला. रहाणेने दुसर्या डावात भारताचे दोन गडी स्वस्तात बाद झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना पुनरागमनाची संधी न देता, पहिल्या चेंडूपासून आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 27 चेंडूंत नाबाद 38 धावा ठोकल्या. रहाणे कर्णधार म्हणून संयमी आहे. तो आपल्या फलंदाजीतून आक्र मकपणा दाखवून देतो. तुम्ही काय करीत आहात, यावर संघातील खेळाडूंचा तुमच्यावर पूर्ण विश्वास हवा आणि तुम्हाला फक्त चांगली खेळी साकारण्याची गरज असते. संघाचे मनोधैर्य यातून आपोआप उंचावते. कोहली आणि रहाणे यांचे कौशल्य भिन्न आहे. पण धरमशालात रहाणेने ज्या पद्धतीने नेतृत्व केले ते वाखाणण्याजोगे आहे, असेही चॅपेल म्हणाले.