रिक्षा व्यवसाय मोडीत काढण्याचा सरकारचा डाव

0
आर.टी.ओ.कार्यालयावर रिक्षा चालकांचे विविध मागण्यांसाठी सरकार विरोधात निर्देशने
कल्याणकारी मंडळ झालेच पाहिजे
पिंपरी चिंचवड : रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मंगळवारी सरकार विरोधात घोषणा देवून निर्देशने करण्यात आली. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. पंचायत शहर अध्यक्ष सोमनाथ कलाटे, दत्त भोसले, गोकुळ रावलकर, दिलीप साळवे, लखन लोंढे, जेकब मेथ्यव, नवनाथ लोखंडे, सुदाम बनसोड, अरविंद काळे, बाळासाहेब सोनवणे आदी उपस्थित होते.
रिक्षा चालकांमध्ये संतापाची लाट…
रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, त्यांना सामाजिक सुरक्षा आरोग्य विमा, म्हातारपणी पेंशन मिळावी, बेकायदेशीर वाहतूक बंद करावी, ओला उबेर या कंपन्यांवर बंद आणावी, रिक्षा चालकांसाठी घरकुल योजना राबवावी, इन्शुरन्सचे वाढलेले दर कमी करावेत, यासह इतर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
बाबा कांबळे म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व आर.टी.ओ.कार्यालयावर हे आंदोलन होत आहे. रिक्षा व्यवसाय मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे, नवीन नियम आणि जाचक अटीमुळे रिक्षा चालकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सरकारने रिक्षा चालकांचे प्रश्‍न न सोडविल्यास रिक्षा चालकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण होईल हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी कल्याणकारी मंडळ झालेच पाहिजे, आम्हाला पेंशन मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या.