रेल्वेनेही दिला मदतीचा हात : गरजूंना फुड पाकिटांचे वाटप

0

रक्तदान शिबिराचे आयोजन : विभागात तास अधिकारी व कर्मचारी कार्यरत

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असून रेल्वे सेवा ठप्प झाली आहे मात्र असे असलेतरी मालगाडीद्वारे जीवनावश्यक पदार्थांची अन्य सामानाची वाहतूक सुरू असून खर्‍या अर्थाने रेल्वेने देशसेवेत योगदान दिले आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने शनिवार, 28 रोजी मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ आणि पुणे विभागात स्टेशन परीसरातील गरजू लोकांना सुमारे क हजार अन्नाची पाकिटे वाटप केली. सर्व विभागातील रेल्वे अधिकारी व कर्मचारी 24 तास कार्यरत झाले आहेत.

गरजूंना दररोज फूड पाकिटाचे वाटप
छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई आणि मुंबई सेंट्रल येथील आयआरसीटीसी बेस किचनमध्ये गरीब आणि गरजू लोकांसाठी जेवण (डाळ खिचडी) तयार केली जात आहेत. आरोग्यविषयक मानदंडांचे पालन करून सुमारे दोन हजार फूड पॅकेट तयार केली जात आहेत आणि त्याचे वाणिज्यिक विभाग आणि आरपीएफमार्फत वितरण केले जात आहे. या व्यतिरिक्त, कॅटरिंग स्टॉल मालक, वाणिज्य विभाग कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी अन्न पॅकेट वितरणात वैयक्तिक योगदान देत आहेत. सोलापूर विभागात 140 खाद्यपदार्थांची पाकिटे, नागपूर 150 खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, पुणे विभाग 150 खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, मुंबई विभाग व भुसावळ जवळपास 350 खाद्यान्न पाकिटे स्थानकांजवळील गरजू व गरीब लोकांना वाटण्यात आली.

लातूरात रक्तदान शिबिर
लातूर स्थानकात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले त्यामध्ये 45 जणांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदानानंतर सुरक्षित अंतर, स्वच्छता यासारख्या खबरदारी घेण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातर्फे कळवण्यात आले आहे.