‘लव्ह जिहाद’ विरोधात देशव्यापी कायदा लागू करा !

‘लव्ह जिहाद : हिंदु सून हवी, मात्र हिंदु जावई नको !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

गेल्या 1400 वर्षांपासून हिंदू युवती आणि महिलांच्या विरोधात जिहाद राबवला जात आहेहिंदू युवतींना फूस लावूनफसवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढले जात आहेत्यांच्याशी लग्न करून नंतर त्यांचा छळ केला जात आहेआता याची सीमा ओलांडली आहे. ‘लव्ह जिहाद’ अंतर्गत निकिता तोमरतनिष्का शर्मा या युवतींच्या केलेल्या हत्या या हल्लीच्याच घटना जिहादींचे मनोबल वाढवत आहेतहिंदु युवती आणि महिला यांच्या बाबतीत ‘लव्ह जिहाद’ ही एका राज्याची समस्या नसून राष्ट्रीय समस्या आहेत्यामुळे संपूर्ण देशभर ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा लागू केला पाहिजेअशी मागणी गाजियाबाद येथील डासना देवी मंदिराच्या महंत यति मां चेतनानंद सरस्वति यांनी केलीत्या हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘लव्ह जिहाद हिंदु सून हवीमात्र हिंदु जावई नको !’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होत्या.

    महंत यति मां चेतनानंद सरस्वति पुढे म्हणाल्या की, ‘विवाह’ आणि ‘निकाह’ यांमध्ये काय अंतर आहेहे हिंदु पालकांनी आपल्या मुलांना शिकवलेलेच नाहीजे हिंदु युवक मुसलमान युवतींशी विवाह करतातत्यांंच्या हत्या केल्या जातातअशा अनेक घटना समोर आल्या आहेतहिंदूंनी आता बचावात्मक भूमिकेत राहणे सोडून आपल्या युवतींच्या रक्षणासाठी प्रयत्नरत झाले पाहिजे.

      सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कुकृतिका खत्री म्हणाल्या कीविवाहानंतर हिंदू स्त्रियांना ‘अर्धांगिनी’चा दर्जा दिला आहे. ‘लव्ह जिहाद’ हे एक षड्यंत्र असून यांपासून हिंदू युवतींना वाचवण्याची आवश्यकता आहेयाविषयी समाजात जागृती करायला हवीआपल्या मुलींना धर्मशिक्षण देऊन योग्य संस्कार द्यायला हवेतसाधनेमुळे आपले गमावलेले संतुलन मिळवता येतेजर आपल्या हिंदु धर्माविषयी हिंदू युवतींना शिकवले नाहीतर धर्माभिमान नसलेल्या हिंदू युवतींना फूस लावून कोणीही पळवून नेईल. ‘इस्लाम’ काय आहे त्यामध्ये महिलांना काय दर्जा आहे हे सुद्धा आपल्या युवतींना सांगण्याची गरज आहे.

लव्ह जिहाद’ भारताच्या जनगणनेचे संतुलन बिघडवत आहे ! – श्रीसमीर चाकू

 

     हिंदू युवतींना जाळ्यात ओढण्याचे ‘लव्ह जिहाद’ हे सामुदायिक षड्यंत्र आहेहिंदु युवक असल्याचे भासवून मुसलमान युवक हिंदू युवतींना या षड्यंत्रांतर्गत फसवत आहेतहिंदु युवतीला मुसलमान युवकाशी शरियत कायद्यानुसार ‘निकाह’च करावा लागतोया ‘निकाहा’नंतर त्या महिलेला संपत्ती किंवा अन्य अधिकार मिळत नाहीतहे लक्षात घेतले पाहिजेहिंदू युवतींशी ‘निकाह’ केल्यावर त्यांचा छळ करून त्यांची हत्या केली जातेत्यांना वेश्या व्यवसायात पाठविले जातेअशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ‘लव्ह जिहाद’ भारताच्या जनगणनेचे संतुलन बिघडवत आहेअसे ‘द लीगल हिंदु’चे सहसंस्थापक आणि राष्ट्रीय समन्वयक श्रीसमीर चाकू या वेळी म्हणाले.