चिन्मय जगताप(जळगाव): राज्यातील विनाअनुदानित व अंशता अनुदानित शाळेत काम प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. लॉकडाऊन काळात तब्बल 27 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 16 शिक्षकांनी पगारा अभावी आत्महत्या केल्या असून काळजीने 11 जणांनी हृदयविकाराच्या धक्क्यात आपले प्राण गमावले आहेत. राज्यात शेतकर्यांच्या शिक्षकांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत.आता तरी शासनाचे डोळे उघडतील का ? असा संतप्त सवाल शिक्षक बांधवांनी उपस्थित केला आहे.
म्हणून घडल्या या घटना
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित व काही अंशता अनुदानित शाळे मध्ये 600000 हि अधिक शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी काम करात आहेत .यातील काही शाळेतील शिक्षक 20 टक्के अनुदानास पात्र ठरलेत.त्यानंतर सन 2016 पासून वाढीव अनुदान मिळावे वविनाअनुदानित शाळांना अनुदान प्राप्त व्हावे यासाठी शिक्षकसंघटना लढा देत आहेत. लॉकडाऊन काळात पगार नसल्याने 16 शिक्षकांनी आत्महत्या केल्या तर उर्वरित 11 जणांनी काळजीनेहृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राण गमावले. 2000 साली कायम विनाअनुदानित या नावाखाली मान्यता मिळालेल्या या शाळांतील जवळपास 60 हजारहुन जास्त शिक्षकांच्याअनुदानाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. 26ऑगस्ट 2020 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत या सर्वांच्या 345.93कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळणार होती. मात्र परत एकदाश्रेयवादामुळे सर्वसामान्य शिक्षकांच्या पदरी घोरनिराशा पडली. यापूर्वीच्या सरकारने मंजूर केलेले 345कोटी निधी वितरणाचे आदेश काढायचे सोडून विनाकारण त्रुटीसमिती तयार करून शासन वेळकाढूपणा करत आहेत. याअनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या 27 जणांनी आपले प्राण गमावलेआहेत. वीस वर्षापासून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रराज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समिती व स्वाभिमानी शिक्षक संघटना झगडत आहे.सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी यांचा लढा सुरू आहे. शासनाने आता अंत पाहू नये, अनुदान सुरू करून जीवदान द्यावे अशीत्यांची मागणी आहे.
लॉकडाऊन काळातील मृत शिक्षक
लॉकडाऊन काळातील मृत शिक्षकांमध्ये संभाजी जाधव (जत), सुनील नायदे (जळगाव), सुहेल अन्सारी(धुळे), राजेश जाधव (जालना), जीवन डेंगळे (नागपूर), आशिषकांबळे (जालना),अनिल बडगुजर (जालना), श्रीमती योगिनी चव्हाण (नाशिक),आशिष मेश्राम (हटवांजरी), भागवत दुर्गाराम (विटा), एकनाथ सोळुके (जालना), एम.पी.मानसिंग, गंगाराम चौधरी (डहाणू)दिलीप पाटील (जालना), सागर निळे (नंदुरबार), सुमेध राऊत(नांदेड), गिरीश मोरे (धुळे), मनोरंजन सोनटक्के (हिंगोली), सचिन नारनवरे (चंद्रपूर), ज्ञानेश्वर पल्लाळ (लासुर स्टेशन), मनिरामजाधव (साखरा), संजय राऊत (नागपूर), महेश खवास (भंडारा),मनोज गुजरकर (वर्धा), पकमोडे बाबू (हटवांजरी), दर्यावशिंगतुरकर (शांतिनिकेतन), सलीम सय्यद (पलूस) यांचा समावेश आहे.
सरकारनेने या घटनांची दाखल घेत हा प्रश्न निकाली लावावा
2001 पासून आमचा अनुदानाचा प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नांकडे राज्यशासना कडे कित्येकदा निवेदन देऊन सुद्धा राज्यासासन या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीये.सत्ता बदलते राज्यकर्ते बदलतात पण आमचे प्रश्न सुटत नाहीयेत.या करिता सरकारने ने या घटनांची दाखल घेत हा प्रश्न निकाली लावावा अशी आमची मागणी आहे.
राहुल खैरनार , नाशिक
विभाग अध्यक्ष , स्वाभिमानी शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य