लोकडाऊन कालावधी वाढविण्याचा विचार नाही

0

नवी दिल्ली – केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी दिले आहे. हा कालावधी वाढविला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जनतेत आहे. त्याला गौबा यांच्या स्पष्टीकरणामुळे पूर्णविराम मिळाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 24 माार्च रोजी, देशभरात 21 दिवसीय लॉकडाऊन घोषित केला होता.