लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या

0

पिंपरी: पीडित – शोषितांचा आवाज आपल्या लेखणीतून शब्दबद्ध करणारे थोर समाजसेवक, लेखक – कवी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती 1 ऑगस्टला साजरी झाली. त्यांच्या विचारांचा वारसा आपण त्यांचे अनुयायी म्हणून अखंडपणे तेवत ठेवू, असे सांगत  लोकशाहिर आण्णा भाऊ साठेंना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी टायगर ग्रुपतर्फे करण्यात आली आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती टायगर ग्रुपतर्फे साजरी करण्यात आली.

यावेळी टायगर ग्रुप पिं.चिं.अध्यक्ष सिध्दार्थ गायकवाड, भोसरीचे करण पटेकर, ॠतिक मसुरे, प्रविण आडारी, प्रविण कांबळे, सोहेल शेख उपस्थित होते.