लोहारा । येथील सरपंचपदासाठी आज लोहारा ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी 2 वाजता विशेष सभेचे आयोजन निवडणूक अधिकारी सर्कल सोनवणे यांचे उपस्थीतीत करण्यात आले होते होते. सुरुवातीला सरपंचपदासाठी मालती संजय पाटील, योगीता सुनिल क्षीरसागर, आशाबाई शांताराम चौधरी या तीन सदस्यानी उमेदवारी दाखल केल्या होत्या. मात्र माघारीच्या वेळेत मालती पाटील व योगीता क्षीरसागर यांनी अर्ज माघार घेतल्याने व आशाबाई चौधरी यांचा एकमात्र अर्ज शिल्लक राहील्याने त्यांची बिनविरोध सरपंच निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी सोनवणे यांनी जाहीर केले. सदर सभेसाठी सर्व 17 ग्रामपंचायत सदस्य हजर होते.