वंदे मातरमवरून वाद पेटणार ? भाजप-सेना सक्ती करण्याची करणार मागणी

0

मुंबई  – मद्रास उच्च न्यायालयाने सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी वंदे मातरम् मानण्याच्या दिलेल्या निर्णयानंतर आज राज्यात वंदे मातरमच्या सक्तीच्या मागणीवरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप सेनेने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून राज्यात सक्ती करण्याची मागणी करनार असल्याचे सांगितले असतानाच राज्यातील मुस्लीम आमदार अबू आझमी व वारीस पठाण यांनी कोणताही सच्चा मुस्लिम वंदे मातरम्’ गाणार नाही, असे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे

काही दिवसांपूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी वंदे मातरम् गाण्याची किंवा वाजवण्याचा निर्णय जाहीर केला यासंदर्भात बोलताना भाजप आमदार राज पुरोहित म्हणाले कि शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालयांमध्येही वंदे मातरम् गाण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेण्याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले वेळ पडली तर सभागृहातही आवाज उठवेन, असे पुरोहित म्हणाले.

.यावर बोलताना अबू आझमी यांनी आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच वंदे मातरम् गाणार नाही. मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो. मात्र माझा धर्म मला वंदे मातरम् म्हणण्याची परवानगी देत नाही. मग कारवाई करा, किंवा जेलमध्ये टाका असे खळबळजनक वक्तव्य केले

वंदे मातरमच्या मुद्द्यावरुन शिवसेनाही मैदानात उतरली आहे. एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी वंदे मातरम् बोलणार नाही’ असे वक्तव्य केले कोणतीही विचारधारा कोणावर सोपवू शकत नाही. मी वंदे मातरम् म्हणणार नाही. माझा धर्म, कायदा आणि संविधान मला याची परवानगी देत नाही. माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी बोलणार नाही. विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला तरी विरोध करेन’ असे एमआयएमचे आमदार वारिस पठाण म्हणाले.

पठाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना गळ्यावर सुरी ठेवण्याचा प्रश्नच नाही. मात्र इतकीच लाज वाटत असेल, तर स्वतः चालते व्हा. ही आमची मातृभूमी आहे. या भूमीला स्वतंत्र करणारे हे गीत आहे. त्या गीताचा आदर करण्याचा जर त्रास होत असेल, तर इथून निघून जा. ह्यांना पाकिस्तानची आठवण का येते? बांग्लादेशची आठवण का होत नाही? हे राहतात इथे, मात्र मनाने पाकिस्तानी आहेत. अशा शब्दात शिवसेना नेते दिवाकर रावतें यांनी संताप व्यक्त केला.