शासनाने तात्काळ ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे’ उभारावीत

मुंबई – महाराष्ट्र शासनाने वारंवार निर्माण होणारा चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन त्यापासून नागरिकांचे रक्षण होण्यासाठी रायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग आणि पालघर या चार जिल्ह्यांतील एकूण 11 ठिकाणी वर्ष 2019-20 मध्ये ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र’ उभारण्याचा निर्णय घेतला होतात्यासाठी 42 कोटी 39 लाख रुपयांची तरतूदही केली होतीमात्र ठरलेल्या 18 महिन्यांच्या मुदतीत ही निवारा केंद्र उभारली गेली नाहीतपरिणामी नुकत्याच आलेल्या ‘तौक्ते’ या भयंकर चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीची प्रचंड हानी झाली आहेघरेफळबागाशेती यांची अतोनात हानी झालीठरलेल्या मुदतीत ही बांधकामे झाली असती ‘फना’, ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ अशा एका पाठोपाठ येणार्‍या चक्रीवादळांच्या काळात या निवारा केंद्रांचा मोठा आधार कोकणवासियांना झाला असतातरी शासनाने वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ तातडीने उभारावीतअशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्रीसुनील घनवट यांनी ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या माध्यमांतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माउद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहेमुख्यमंत्र्यांनी सदर विषय संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी निर्देशित केला आहे.

           राज्याच्या महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिवतसेच रायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग आणि पालघर या चार जिल्ह्यांचे पालकमंत्री अनुक्रमे अदिती तटकरे,  अनिल परब, डॉउदय सामंतआणि दादा भुसे यांनाही या विषयीचे निवेदन देण्यात आले आहेया निवेदनात पुढे म्हटले आहे कीवैश्‍विक हवामान बदलामुळे आणि वारंवार कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहेतसेच आगामी काळात अशी चक्रीवादळे येणार असल्याचे हवामान खात्याने नमूद केले आहे.

        वर्ष 2019-20 मध्ये चार जिल्ह्यांतील काळेथरआचराजामसंडेविजयदुर्गसैतवडेहर्णेएडवणदिघीदाभोळबोर्ली आणि उसरणी येथे बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाने घेतलात्या ठिकाणी ही निवाराकेंद्र समयमर्यादा ठेवून तात्काळ उभी करावीज्याप्रमाणे चक्रीवादळाच्या पूर्वी मच्छीमारांना पूर्वकल्पना दिली जातेत्याचप्रमाणे वादळी क्षेत्रातील फळबागायतदारशेतकरीव्यावसायिक यांनाही सतर्क करण्यासाठी यंत्रणा उभी करावीजेणेकरून या वादळापूर्वी पिकांचा उतारा घेऊन या सर्वांची हानीही टाळता येईलत्यासह चक्रीवादळांच्या क्षेत्रांत पीकांचीफळबागांची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने तेथे कोणती पिके घ्यावीतवादळामुळे होणारी हानी टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावीतेथील बांधकामे कशा प्रकारची असावी याविषयीही तेथील नागरिकांना मार्गदर्शन करावेेतसेच पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांत आलेल्या चक्रीवादळांची पूर्वतयारी म्हणून लक्षावधी नागरिकांचे प्राधान्याने स्थलांतर केल्याने तेथील संभाव्य जिवीतहानी टळलीत्याच धर्तीवर राज्य शासनाने उपाययोजना कराव्यातअशा मागण्याही शासनाकडे करण्यात आल्या आहेत.