मुंबई- तिसर्या दिवसाच्या खेळा सुरवातीलाच पुजारा बाद झाल्याने भारताला मोठा धक्का बसला.यानंतर कर्णधार विराट कोहली याने येवून मुरली विजय बरोबर चांगली फलंदाजी केली. भारताला सुस्थिती नेण्याचा मार्ग मोकळा करित असतांना 116 ची भागीदारी झाली असतांना व भारताची धावसंख्या 262 आली असतांना मुरली विजय वैयक्तिक 136 धावावर बाद झाला.त्याने आपले आलोचकांना शतकी खेळूत चांगले उत्तर दिले.यानंतर आलेले फलंदाज करण नायर13,तर विकेट क्रिपर व फलंदाज पार्थिव पटेल हा आपल्या फलंदाजीची जादू दाखवू शकला नाही तो 15 रनावर बाद झाला.तर आर.आश्विन याने गोलंदाजीत आपली जादू दाखविली मात्र तो फलंदाजीत पाहिजे तशी जादू दाखवू शकला नाही.तो शुन्यावर बाद झाला. तर रविद्र जडेजा ही गोलंदाजीत जादू दाखवून फलंदाजीत मात्र अवघ्या 25 धावावर बाद झाला. यानंतर आलेल्या जयत यादव याने कर्णधार विराट कोहली याला चांगली साथ दिली,तिसर्या दिवसा अखेर विराट कोहली 147 धावांवर,तर यादव 30 धावावर खेळत आहे.