विजेच्या धक्याने शेतमजुर तरुणाचा मृत्यू

0

चाळीसगाव – तालुक्यातील रोहिणी शिवारातील शेतात बैल चारत असतांना विजेचा धक्का लागुन २० वर्षीय शेतमजुर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपुर्वी घडली असुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बैल चारत असतांना झाली घटना
प्राप्त माहिती नुसार गोरख उर्फ मुकेश ज्ञानेश्वर थोरे (२०) रा रोहिणी ता चाळीसगाव हा तरुण रोहिणी शिवारात असलेल्या नागेश्वर कैलास झाडे यांच्या शेतात शेतमजुर म्हणून कामाला होता आज दिनांक ७ रोजी गोरख हा शेतात बैल चारत असतांना विजेच्या खांबाला ताण दिलेल्या लोखंडी वायर रोपला असलेल्या विजेचा धक्का त्याला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतमजुरांना गोरख थोरे याचा मृतदेह दिसल्याने ही घटना माहीत पडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.