विधानसभेत 19 आमदार निलंबीत

0

शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, काँग्रेसचे अब्दुल्ल सत्तार यांच्यासह अनेक आमदारांचा समावेश आहे. या सर्वांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात यावं, असा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिला. तो मान्य करण्यात आला.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 18 मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवत विरोधकांनी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता.

सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे असे आरोप ठेवून या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

हे आमदार निलंबित

अमर काळे – काँग्रेस, आर्वी मतदारसंघ, वर्धा

भास्कर जाधव – राष्ट्रवादी- गुहागर मतदारसंघ

विजय वडेट्टीवार- काँग्रेस

जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, ठाणे

हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस बुलडाणा

मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड

अब्दुल सत्तार – काँग्रेस, सिल्लोड, औरंगाबाद

संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर

अवधूत तटकरे – राष्ट्रवादी

डी.पी. सावंत – काँग्रेस, नांदेड उत्तर

संग्राम थोपटे – काँग्रेस, भोर, पुणे

अमित झनक – काँग्रेस, रिसोड

कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण

-दीपक चव्हाण – राष्ट्रवादी, फलटण – सातारा

राहुल बोंद्रे – काँग्रेस चिखली, बुलडाणा

नरहरी जिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी, नाशिक

वैभव पिचड- राष्ट्रवादी, अकोले – अहमदनगर

जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा

दत्ता भरणे – राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर, पुणे