कोलकाता । भारतीय क्रिकेट संघांचे मार्गदर्शक रवी शास्त्री यांनी पुन्हा विराट कोहलीचे कौतुक केले आहे. नुकताच भारतीय संघ विराटच्या कर्णधारपदाखाली दक्षिण आफ्रिकेमध्ये एकदिवसीय आणि टी20 क्रिकेट मालिका खेळून आणि जिंकून परतला आहे. रवी शास्त्रींच्या मते विराट हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज आहे. रवी शास्त्रीनी विराटची तुलना पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांच्याशी केली आहे. विराट अजूनही तरुण आहे, पण इतक्या कमी वयातही त्याच्या खेळामुळे त्याची तुलना अनेक दिग्गज खेळाडूंसोबत होत आहे. संघाचे नेतृत्त्व करण्याच्या बाबतीत इम्रान खान आणि विराट कोहली यांच्यामध्ये अनेक समान गुण आहेत. असे म्हणत रवी शास्त्रींनी विराटचे कौतुक केले आहे.
नुकताच दक्षिण आफ्रिकेमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये विराटने 5000 धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा विराट हा पहिलाच खेळाडू आहे. इम्रान आणि विराटमध्ये समानता पाहायला गेल्यास दोघांमध्येही वर्चस्व राखण्याची क्षमता आहे. विराट कोहलीदेखील इम्रानप्रमाणेच त्याच्यातील पॉझिटीव्हिटी दुसर्यांना देऊ शकतो. यामुळे संघामध्ये चैतन्य निर्माण होण्यासाठी मदत होते. रवी शास्त्री यांनी एम एस धोनीच्या टीकाकारांनाही उत्तर दिले आहे. धोनीकडे असलेला अनुभव इतर खेळाडूंकडे नाही. त्याचा फायदा संघाला होतो. सोबतच या टप्प्यावर त्याच्याकडे असलेला फिटनेस वाखाणण्याजोगा आहे.