विहिरीत उडी घेऊन एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

0

बुलडाणा : एकाच कुटूंबातील चौघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मेहकर तालुक्यातील बाभुळखेड येथे सोमवारी सकाळी हि घटना घडली.

मृतकांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. मनीषा अंकुष गायकवाड (२८), समर्थ अंकुश गायकवाड, युवराज अंकुश गायकवाड, शिवाजीराव बकाल (५८) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. घरघुती वादामधून ही आत्महत्या झाल्याची माहिती आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.