पालघर: भाजप-सेनेने २०१९ ची निवडणूक युतीत लढविली मात्र निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना भाजपात प्रचंड तणाव निर्माण झाला आणि शेवटी शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पाठींब्यावर सरकार बनविले. दरम्यान आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालघर येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिसेनेने फक्त आमच्याशीच नाही तर जनतेशी देखील बेईमानी केली असल्याच्या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या जीवावर सरकार बनविले असून ते फार काल टिकणार नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. सत्तेत नसताना शेतकऱ्यांना २५ हजाराची मदत देण्याची भाषा करणाऱ्यांनी सत्तेत आल्यावर शब्द फिरविणे हा जनतेशी बेईमानी असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंनी मदत केली नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
मंत्रिमंडळ विस्तारावरून देखील देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले.